|
कोकण ही महाराष्ट्रातील ७२० किमीची अरुंद अशी किनारपट्टी आहे, जिच्यां पश्चिमेला अरबी
समुद्र आहे आणि पूर्वेला समांतर अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. येथील जैवविविधता,
परंपरा, पाककृती आणि भाषांमध्ये कोकणाचे वेगळेपण आहे. कोकण विभाग सात जिल्ह्यांमध्ये
विभागलेला आहे.
अधिक जाणून घ्या...
|
|
|
|
कोकणाचा ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्याा काळापर्यंत जातो. प्राचीन
काळात कोकणाच्या् किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून
ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर
शक, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, मुघल, मराठे आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची
राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत
कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही
येथे होती.अधिक जाणून
घ्या...
|
|
|
|
|
छत्रपती शिवाजी महाराजांचा शासनकर्ते म्हणून कोकणावर मोठा प्रभाव आहे. त्यांनी त्यांचे
आरमार कोकणात स्थापन केले आणि त्यांची राजधानी रायगड कोकणातच होती. सरखेल कान्होजी
आंग्रे यांच्या नेतृत्वा खाली मराठा आरमार भरभराटीला आले आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर
त्यांनी अंमल प्रस्थापित केला. कोकणात आज दिसणारे जलदुर्ग हे छत्रपती शिवाजी महाराजांनी
मराठ्यांचे सशक्त आरमार उभे केल्याच्या खूणा आहेत. सिंधुदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी
बांधलेला एक अप्रतिम जलदुर्ग त्या् महान नेत्याचे आज स्मारकच बनला आहे. या दुर्गावर
छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे आणि त्यात त्यांच्या् पुतळ्याची नियमित पूजाही
चालते.अधिक जाणून घ्या...
|
|
|
|
कोकणाने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी खूप हातभार लावला. देशाची
आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी मुंबई कोकणातच वसलेली आहे. औद्योगिक
आणि गृहनिर्माण उद्योग वृद्धी ही मुंबई महानगर प्रदेश, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने
झाली आहे. बागायत आणि मासेमारी हे कोकणातील प्रमुख उद्योगांपैकी आहेत. मत्स्यनिर्यातीतून
मिळणाऱ्या परकीय चलनाने राष्ट्रीय उत्पन्नातील मोठा भाग व्यापला आहे. मुंबई आणि जेएनपीटी
या भव्य. बंदरांसह अन्यह काही छोट्या बंदरांनी कोकण विभागाच्या विकासाला मोठा हातभार
लावला आहे.अधिक जाणून घ्या
...
|
|
|
|
|
|
अप्रतिम समुद्रकिनारे, घनदाट अरण्य आणि विपुल जलस्रोत यामुळे पर्यटन हा उद्योगही कोकणात
झपाट्याने वाढत आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पर्यटनक्षेत्रामध्ये सातत्याने रोजगारनिर्मिती
होत आहे. अधिक जाणून घ्या...
|
|
|
|
कोकणातील लोक स्वभावत:च उत्सवप्रिय आहेत. उत्सवांप्रतीचे त्यांचे प्रेम त्यांच्या संस्कृतीत
खोलवर रुजले आहे आणि ते वर्षभर साजऱ्या होणाऱ्या विविध सण-उत्सवांतून व्यक्त होत
असते. कोकणात साजरे होणारे काही प्रमुख सण – दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी,
नारळी पौर्णिमा, होळी, नागपंचमी आणि मकरसंक्राती.अधिक
जाणून घ्या...
|
|
|
|
|