कोकणाला ७२० किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे, तो उत्तरेला डहाणू आणि बोर्डी तसेच
दक्षिणेला वेंगुर्ला येथे पसरत गेलेला आहे. कोकण हे सात जिल्ह्यांनी बनलेले आहे. ते
म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग.
कोकण हे भौगोलिक, सांस्कृतिक आणि वास्तू अशा अनेकगोष्टीत आवड निर्माण करणारे ठिकाण
आहे. कोकण किनारपट्टीवर सुपारीची, नारळाची झाडे, आंब्याची झाडे आहेत तसेच शेती, मंदिरे,
खाडी, सागरी किल्ले, बंदरे, गरम पाण्याचे झरे, लेणी आणि कौलारू घरे येथे आहेत.
महाराष्ट्रात कोकण हे एक मुख्य पर्यटन क्षेत्र आहे. कोकणातील सुंदर सागरी किनारे, हिरवीगार
पालवी, जगप्रसिद्ध वारली कला आणि सागरी किल्ले याकडे पर्यटक सतत आकर्षित होतात.
कोकण पर्यटन अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा
|