हा एक छान आणि स्वच्छ किनारा आहे. या किनाऱ्यावर प्रदूषणरहित हवा आणि सुंदर निळा समुद्र
असं वातावरण आहे. पुण्यापासून जवळ असलेले व एकमेकांपासून अंदाजे १५ किमीच्या अंतरावर
तीन उत्तम किनारे आहेत – श्रीवर्धन – हरिहरेश्वर – दिवेआगर. हा किनारा महाराष्ट्रातील
सर्वात लोकप्रिय किनाऱ्यांपैकी एक आहे.
श्रीवर्धन किनाऱ्यावर महाराष्ट्राच्या सर्व भागांमधून सहजपणे जाता येते. श्रीवर्धन
किनाऱ्यावर बोटींग, सेलींग, पोहणे, बिच व्हॉली बॉल आणि बिच वॉकींग हे असे उपक्रम आहेत.
|