थंडगार वारा, फेसाळत्या समुद्राच्या लाटा, नारळी पोफळीच्या बागा आणि सोबत कोकणी खाद्यपदार्थांची मेजवानी हे समीकरण वेळासमध्ये अगदी सहज जुळून येते. दुर्मिळ ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांमुळे…








भौगोलिक स्थान

सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते त्या मुखावर हरिहरेश्वर हे गाव वसले आहे. डोंगर रांगा आणि मंदिरांनी वेढलेला हा परिसर दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे.
वेंगुर्ला येथील रमणीय समुद्रकिनारा हे या शहराचे वैभव आहे. इथल्या स्वच्छ समुद्र किनाऱ्यावर पॅरासेलिंग, बनाना बोट राईड, स्कूबा डायव्हिंग, मासेमारी असे अनेक अनुभव घेण्यासाठी पर्यटक…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्लेपासून १७ कि.मी. अंतरावर असणारा शिरोड्याचा समुद्र हा रम्य वातावरण आणि निळ्याशार पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. समुद्र किनाऱ्यालगतच तुम्हाला नारळी पोफळीची शेकडो झाडे दिसतील.
प्राचीन मंदिरे, नारळी-पोफळीच्या आणि सुपारीच्या बागा, हापूस आंबे यासाठी प्रसिद्ध असलेले गुहागर हे कोकणचे वैभव आहे. शहराच्या मध्यभागी, आपल्याला १२ व्या शतकातील शिव मंदिर, व्याडेश्वर…
हर्णे आणि मुरुड ही दोन टुमदार शहरे स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. हर्णे समुद्रकिनारा हा मच्छीमारांसाठी मोक्याचे ठिकाण आहे तर मुरूड येथे…
डहाणू-बोर्डी किनारा हे डहाणूमधील पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे. समुद्र किनाऱ्याबरोबरच चिकू आणि इतर फळांच्या बागांसाठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
स्वच्छ समुद्र किनारा लाभलेले श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव. या ठिकाणी तुम्हाला अनेक पेशवेकालीन वास्तू आणि मंदिरे पाहता येतील.
निसर्गरम्य समुद्र किनारा आणि बोटींग, जेट स्कीइंग, पॅरासेलिंग अशा विविध साहसी खेळांमुळे तारकर्ली हे देश-विदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरते आहे. इथल्या स्कूबा डायव्हिंग केंद्राला भेट…
रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे ठिकाण विशेषत: थंडीच्या दिवसांत पर्यटकांनी गजबजून जाते. या किनाऱ्यावर अनेक स्थलांतरित पक्षी सुद्धा पाहायला मिळतात.